बलात्काराच्या गुन्ह्यात त्रिपुराचा क्रमांक देशात कायम पहिला-दुसरा असतो. ६५ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगते आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून शिक्षण व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. तरीही डावे नेते देशभरात 'त्रिपुरा मॉडेल'चे तुणतुणे वाजवत असतात. इतक्या थापा मारण्यासाठी केवळ खोटेपणा पुरेसा नसून जोडीला भरपूर कोडगेपणाही गरजेचा आहे. डाव्या नेत्यांमध्ये तो ठासून भरला आहे.
गोध्राकांडानंतर २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल आणि १९८४ मध्ये घडलेल्या शीख हत्याकांडाइतकीच भीषण दंगल १९८० मध्ये डाव्या आघाडीची सत्ता असताना त्रिपुरात घडली होती; पण रक्तपाताच्या कामात डाव्यांची सफाई इतकी की ना हत्यारावर रक्ताचे डाग दिसत, ना चेहऱ्यावर, 'जब चुप रहेगी जुबान ए खंजर लहू पुकारेगा आस्तीनका...' हे फक्त सिनेमात ऐकावे.
हजारो निरपराध आणि राजकीय विरोधकांच्या शवांच्या ढिगाऱ्यावर डाव्यांच्या सत्तेचा डोलारा उभा आहे.
गोध्राकांडानंतर २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल आणि १९८४ मध्ये घडलेल्या शीख हत्याकांडाइतकीच भीषण दंगल १९८० मध्ये डाव्या आघाडीची सत्ता असताना त्रिपुरात घडली होती; पण रक्तपाताच्या कामात डाव्यांची सफाई इतकी की ना हत्यारावर रक्ताचे डाग दिसत, ना चेहऱ्यावर, 'जब चुप रहेगी जुबान ए खंजर लहू पुकारेगा आस्तीनका...' हे फक्त सिनेमात ऐकावे.
हजारो निरपराध आणि राजकीय विरोधकांच्या शवांच्या ढिगाऱ्यावर डाव्यांच्या सत्तेचा डोलारा उभा आहे.