संजय पंडित । जगाकडे बघण्याची वेगळीच नजर लाभलेलं अनाकलनिय गूढ व्यक्तिमत्व, सध्या व्यवसायाने लेखक व पत्रकार असले तरी मुळात शिक्षणाने टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, अनेक नोकऱ्या व नंतर व्यवसायाचा अनुभव घेतल्यावर ते आपल्या मूळ पिंडाकडे, पत्रकारीतेकडे वळले. मुंबईतील सेंट लेवीचर कॉलेजातून त्यांनी पत्रकारीतेतील पदवीका धारण केली व काही वृत्तपत्रातून पत्रकारीताही केली. त्याच दरम्यान एका अध्यात्मिक प्रेरणेतून मन या विषयाकडे वळले.
हे पुस्तक संपूर्णपणे भारतीय मानसशास्त्रावर आधारित आहे. मनाच्या आजपर्यंत न सुटलेल्या अनाकलनीय, अगम्य गुंत्यात आजपर्यंतचे सारे मानसशास्त्रज्ञ चाचपडत असताना, पंडित यांनी भारतीय विज्ञान संस्कृतीच्या भरभक्कम आधाराने मन आणि त्याच्या व्यवस्थापनाचे अनेक पैलू सहज, सुंदर, सुबोध शब्दात उलगडून दाखवलेत.
आपल्या व्याख्यानातून, समुपदेशन व संवादातून निराशाग्रस्त मनांन आत्मविश्वासाची उत्तुंग प्रेरणा देतात. वक्ता, समुपदेशक, सल्लागार, पत्रक अशा विविध भूमिकातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य ते करत असतात
हे पुस्तक संपूर्णपणे भारतीय मानसशास्त्रावर आधारित आहे. मनाच्या आजपर्यंत न सुटलेल्या अनाकलनीय, अगम्य गुंत्यात आजपर्यंतचे सारे मानसशास्त्रज्ञ चाचपडत असताना, पंडित यांनी भारतीय विज्ञान संस्कृतीच्या भरभक्कम आधाराने मन आणि त्याच्या व्यवस्थापनाचे अनेक पैलू सहज, सुंदर, सुबोध शब्दात उलगडून दाखवलेत.
आपल्या व्याख्यानातून, समुपदेशन व संवादातून निराशाग्रस्त मनांन आत्मविश्वासाची उत्तुंग प्रेरणा देतात. वक्ता, समुपदेशक, सल्लागार, पत्रक अशा विविध भूमिकातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य ते करत असतात