नाती दृढ करणं असो, स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो; गौर गोपाल दास आपल्याला त्या संदर्भातील या पुस्तकात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात.