माझ्यापुरतं सांगायचं झाल्यास, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येतून जाते, तिथे मला कथा सापडते. या संग्रहातल्या तीसेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रत्येक कथेतलं मुख्य पात्र हे कुठल्यातरी समस्येला तोंड देत आहे अन् शेवटी एक तर ती समस्या सुटते किंवा त्या समस्येसोबतच ते पात्र जगत राहातं. मला अनेक वेळा विचारण्यात येतं 'हे मालगुडी कुठे आहे?' यावर मला एवढंच सांगायचं असतं की ते एक काल्पनिक असं नाव असून कोणत्याही नकाशात ते सापडणार नाही. मी जर म्हटलं की, मालगुडी हे गाव दक्षिण भारतात आहे, तर मी केवळ अर्धसत्य सांगितलं असं होईल, कारण मालगुडीतली ही स्वभाववैशिष्ट्यं तर मला जगात सर्वत्र दिसत असतात. -आर.के. नारायण