ज्यावेळी दुष्टांची दुष्कृत्ये अखेरच्या सीमेपर्यंत पोहोचतात, सारे काही संपल्यासारखे वाटू लागते, ज्यावेळी शत्रूचा विजय झाला असे वाटू लागते, त्यावेळी त्या युगाचा नायक अवतरतो. तिबेटहून स्थलांतरित म्हणून आलेला धसमुसळा, आडदांड शिव हाच तो नायक होता पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती काॽ कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतृत्व करून दष्टांचा संहार करेल का शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वतःला महादेव म्हणजे देवांचाही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा!