मी मिठाची बाहुलीगेल्या शतकातलं चवथं दशक.जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेलीएक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते.अन् पाहता पाहता भाषेची भिंत ओलांडूनमुंबईच्या गुजराथी-मारवाडी नाट्यसृष्टीत एक कुशलगायिका-अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते.तर ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची.म्हणजेच वंदना मिश्र यांची.आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्याएका साध्या, पण मानी धैर्यशील कुटुंबाची.या गोष्टीत आहे अनामिक हुरहूर लावणाऱ्यामुंबईचा अखंड वावरएखाद्या सिंगल पर्सन कोरसप्रमाणे.माणुसकीनं भारलेली अनेक लहान-थोर माणसंया पुस्तकात भेटतील अन्वाचकांना लळा लावतील.वंदनाताईच्या लिखाणात मौखिक परंपरेतलाजिव्हाळा अन् आपुलकी आहे.त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय.हे केवळ स्मरणरंजन नाही,हे आहे एका अपूर्व काळाचंअर्थगर्भ आत्मचिंतन.