मनाविरुध्द गोष्टी घडणारच आहेत. त्यांच्यामुळे मनाला मरगळ येऊ देता कामा नये. उत्साह हा प्रयत्नांनी आणता आणि टिकवता येतो. मग आपलं आयुष्य कुढत बसून वाया कशाला घालवायचं? जे वाईट घडले असेल, त्याबद्दल कुरकुरत न बसता आपण आणि इतरांनी जे उत्तम केले असेल, त्याचे स्मरण करावे, सत्कार करावा आणि भविष्यातदेखील आपण तसेच वागतो, घडवतो आहोत असेच चित्र पहावे. याने आपला आत्मविश्वास आणि उत्साह टिकून राहतो.